ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सीमेवरील जवानांसाठी परंड्यातील विद्यार्थ्यांनी बनवल्या स्वनिर्मित राख्या. रक्षाबंधनाच्या निमित्ताने जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरचा स्तुत्य उपक्रम. A praiseworthy initiative by Jijamata Primary Vidyamandir on the occasion of Raksha Bandhan.

सीमेवरील जवानांसाठी परंड्यातील विद्यार्थ्यांनी बनवल्या स्वनिर्मित राख्या.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरचा स्तुत्य उपक्रम.

A praiseworthy initiative by Jijamata Primary Vidyamandir on the occasion of Raksha Bandhan.
A praiseworthy initiative by Jijamata Primary Vidyamandir on the occasion of Raksha Bandhan.

परंडा दि. २७ (रंगोली न्युज) — A praiseworthy initiative by Jijamata Primary Vidyamandir on the occasion of Raksha Bandhan. रक्षाबंधन या पवित्र सणाचे औचित्य साधून परंडा शहरातील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनोखा व देशभक्तीपर उपक्रम राबविला. शाळेतील अंगणवाडी ते इयत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार करून त्या सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांसाठी पाठविण्यात आल्या.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी घोटीव कागद, मनी, टिकल्या, स्पंज, सुई-दोरा, डिंक आदी विविध साहित्याचा कल्पकतेने वापर करून रंगीबेरंगी व आकर्षक राख्या तयार केल्या. स्वतः तयार केलेल्या राख्या जवानांना पाठविण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, तसेच देशभक्तीचे संस्कार बालवयातच रुजावेत, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या जवानांपर्यंत पोहोचविण्यात आल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशी भावनिक नाते जोडण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या स्तुत्य उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना राख्या तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य, कलाकुसर आणि योग्य पद्धतीचे मार्गदर्शन शिक्षकांनी केले.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष गवळी, संतोष पाटील, नितीन शिंदे, नितीन पाबळे, राजेंद्र जाधव, ज्योती दिवाने, शीला कांबळे, मंगल हिंगणकर, अश्विनी गवारे, सोनाली विभुते, सुजाता देशमुख, दिपाली सुतार आणि धनश्री काळे या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देतानाच देशसेवेची भावना रुजविणारा हा उपक्रम पालक व परिसरातून कौतुकास पात्र ठरत आहे.


Post a Comment

0 Comments