ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

पालक-शिक्षक समन्वयातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास – निशिकांत क्षिरसागर रॉयल पब्लिक स्कूल, आनाळा येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न. Parent-Teacher Meeting Held with Enthusiasm at Royal Public School, Anala

पालक-शिक्षक समन्वयातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास – निशिकांत क्षिरसागर

रॉयल पब्लिक स्कूल, आनाळा येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न

https://www.rangolinews1.com/2026/08/demand-to-release-water-from-ujani-dam.html
https://www.rangolinews1.com/2026/08/demand-to-release-water-from-ujani-dam.html

परंडा, दि. ४ (रंगोली न्यूज): Parent-Teacher Meeting Held with Enthusiasm at Royal Public School, Anala धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील रॉयल पब्लिक स्कूल, आनाळा येथे आयोजित करण्यात आलेला पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवाद व समन्वय किती महत्त्वाचा आहे, यावर या मेळाव्यात विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष निशिकांत क्षिरसागर हे होते, तर संस्था सचिव सौ. प्रियंका क्षिरसागर प्रमुख उपस्थित म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी मार्गदर्शन करताना निशिकांत क्षिरसागर म्हणाले की, "भविष्यातील स्पर्धा केवळ माणसामाणसांमध्ये राहणार नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाशीही असेल. त्यामुळे आपल्या पाल्याला काळाच्या स्पर्धेत सक्षम बनविण्यासाठी पालकांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे आणि मुलांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे."

ते पुढे म्हणाले की, माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा वाढता वापर आणि वाढलेला स्क्रीन टाइम यामुळे पालक व पाल्य यांच्यातील संवाद कमी होत चालला आहे. प्रत्येक पालकाने मोबाईलवरील वेळ कमी करून आपल्या मुलांसोबत अधिक वेळ घालवावा, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधावा आणि त्यांच्या अभ्यासाबरोबरच संस्कार, मानसिक आरोग्य व व्यक्तिमत्त्व विकासाकडेही विशेष लक्ष द्यावे. "आजची मुले हीच उद्याच्या भारताची खरी ताकद आहेत," असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील विश्वास, सुसंवाद आणि समन्वय अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पालकांनी नियमितपणे पालक सभांना उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधल्यास विद्यार्थ्यांच्या प्रगतीला निश्चितच चालना मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पालक मेळाव्यात तानाजी अनाळकर, संगणक अभियंता अबूबकर शेख, अमित देशमुख आणि जगताप मॅडम यांच्यासह अनेक पालकांनी आपली मनोगते व्यक्त केली. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार, विविध उपक्रम, आधुनिक शिक्षणपद्धती आणि शिक्षकांचे समर्पित कार्य याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पालकांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या हितासाठी अशा कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

या मेळाव्यास मोठ्या संख्येने पालक, विशेषतः महिला पालक उपस्थित होत्या. उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी शिक्षकांशी संवाद साधत विविध सूचना व अपेक्षा मांडल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक हनुमंत जगताप, अशोक घाडगे सर, प्रिया देशमुख मॅडम, कविता जगताप मॅडम, करिश्मा शेख मॅडम, पूजा गरड मॅडम, ज्योती शिंदे मॅडम, गीतांजली जगताप मॅडम, उषा क्षिरसागर मॅडम, श्रद्धा पाटील मॅडम, श्वेता क्षिरसागर मॅडम, ऋतुजा बोंद्रे मॅडम तसेच सौ. मीना शिंदे मावशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पालक मेळावा यशस्वी ठरला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा आणि पालक यांच्यातील विश्वास, सुसंवाद आणि समन्वय अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments