Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धरण उशाला कोरड शेतीच्या पिकाला! . ..... शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांमध्ये तिवृ नाराजी. ..... Rangoli News

धरण उशाला कोरड शेतीच्या पिकाला! . .....

सततच्या खंडीत विजपुरवठ्याकडे अधीकारी, कर्मचारी, पुढाऱ्यांचे दुर्लक्ष. .....

शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांमध्ये तिवृ नाराजी. .....

परंडा - दि. १६) परंडा तालुक्यातील सिनाकोळेगाव प्रकल्प हरणओढा परिसरातिल भोंजा, कुंभेजा, कौडगाव, खनापूर परिसरातील शेतकऱ्यांना कायमच सतत खंडीत होत असलेल्या विजपुरवठ्यामुळे उन्हाळा सुरू होण्या अगोदरच शेती पिकांना, पशुधनाला व विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असून याकडे म.रा.वि.वि. कंपनीसह राजकिय पुढाऱ्यांचे दुर्लक्ष दिसुन येत असल्याने शेतकरी ग्रामस्थांमधुन मोठी नाराजी व्यक्त होत आहे.

        दशकापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्याच्या वाट्याला पाचविला पुजलेला दुष्काळ परंडा तालुक्यातील विविध सिंचन व्यवस्थेसह जिल्ह्यातील एकमेव १५०.४९ द.ल.घ.मी असलेला सिनाकोळेगाव प्रकल्प शेतकऱ्यांसह सर्वांनाच वरदान ठरला. त्यामुळे परिसरात साखर कारखाण्यासह अणेक छोटेमोठे उद्योग सुरू झाले. खास करून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या सिनाकोळेगाव प्रकल्प शेतीपिकांसाठी मोठा फायद्याचा ठरतो. त्यामुळे मागील दहा वर्षामध्ये तालुक्यातील ऊस उत्पादन फळपिकांसह इतर पिके, पशुधन व त्यामुळे दुध उत्पादन यामध्ये वाढ होऊ लागली. 

ऊसाच्या एक सरीतुन पाणी बाहेर पडण्या अगोदर विज गायब. ......
       शेती पिकांच्या वाढीसाठी, व तालुक्याच्या प्रगतीसाठी दुसरी गरज म्हणजे सुरळीत नियमीत विजपुरवठा तोच नेमका नाही. सिनाकोळेगाव प्रकल्प हरणओढा परिसरातील भोंजा, कुंभेजा, कौडगाव, खनापूर आदी परिसरात ३३ के.व्ही. सोनारी सबस्टेशन वरू होणाऱ्या कायमच सतत खंडीत विजपुरवठ्यामुळे या परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांना मोठे त्रास सहन करावा लागत आहे. या सततच्या खंडीत विजपुरवठ्यामुळे भोंजा, कुंभेजा, खनापूर, कौडगाव परिसरातील शेती पिकांचे उन्हाळा सुरू होण्या अगोदरच नुकसान होत असून धरण उशाला अण कोरड पिकाला अशी परिस्थीती निर्मान होत आहे. तसेच या गावांमध्ये दिवस रात्र सतत विजपुरवठ्याचा अभाव दिसुन येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होत आहे.

अधीकारी, कर्मचारी व पुढाऱ्यांचे दुर्लक्ष. .....

        सततच्या खंडीत विजपुरवठ्यामुळे परंडा तालुक्यातील भोंजा, कुंभेजा, खनापूर, कौडगाव सह हरणओढा परिसरातील शेतकरी सतत खंडीत विजपुरवठ्यामुळे ग्रासलेले आहेत. याकडे म.रा.वि.वि.कं. चे अधिकारी, कर्मचारी व राजकीय पुढारी यांचे दुर्लक्ष दिसुन येत असल्याची शेतकरी नागरीकांमध्ये चर्चा दिसून येत आहे. 

[ ] शेतकरी कायमच आर्थिक संकटात असतो. त्याच्या शेती मालाला हमी भाव तर मिळतच नाही. ऊसाची बिले वेळेवर मिळत नाही. अशा अणेक समस्या समोर असताना संध्या लाईट ची समस्या सतत भेडसवत आहे. सतत विज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विजपुरवठ्या अभावी ग्रामीण विद्यर्थ्यांच्या शैक्षणिक जिवणावर देखील मोठा परिणाम होत आहे. यावर वेळीच शासनाने उपाय योजना करावी. ..... रवी मोरे (भोंजा)



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी.... 

रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com

-: शहाजी कोकाटे :-

मो.नं. 9890121396

Post a Comment

0 Comments